महाराष्ट्र ग्रामीण

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला; नाशिकमध्ये साधू-महंतांची मोठी मागणी

Nashik News : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक ठराव मांडण्यात आलेत.

Nashik News : कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) अखिल भारतीय संत समितीची (Akhil Bhartiya Sant Samiti) बैठक पार पडली. नाशिक शहरातील साधुसंत या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत साधू महंतानी अनेक ठराव मांडले.  गो हत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा. धर्मशास्त्रावर बोलणाऱ्यांवर बंदी आणण्यात यावी. राज ठाकरे (Raj Thackeray), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालण्यात यावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था, सुरक्षा, शाही स्नानामृत स्नान, राजमार्ग याचे नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधूं संतांचा समावेश करण्यात यावा, असे ठराव यावेळी करण्यात आले.

याबाबत महंत अनिकेत शास्त्री म्हणाले की, भारतीय संत समिती ही 127 संप्रदायांच्या महामेरू म्हणून काम करते.  धर्मशास्त्रामध्ये आपण बघत आहोत की, आपली पंचायतन परंपरा आहे. या परंपरांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून मतभेद नष्ट करून 127 संप्रदाय सामील करून महामेरू म्हणून काम होत आहेत. या संत समितीची आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधू संतांची बैठक झाली.

गो हत्या बंदी कायदा लागू करा

या बैठकीच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने चार ते पाच मागण्यांचा ठराव आम्ही केला आहे. प्रयागराजमध्ये 65 कोटी लोक येऊन गेले, असा आकडा सरकारने जाहीर केला आहे. 65 कोटी पैकी एक सुद्धा व्यक्ती असा नाही की ज्याची इच्छा आहे गाय कापली गेली पाहिजे. याचा अर्थ गोहत्या बंद झाल्या पाहिजेत. देशाच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या म्हणते की, गो हत्या बंद झाली पाहिजे. तर सरकार गोहत्या बंद का करत नाही? त्यामुळे संपूर्ण देशात तत्काळ गोहत्या बंदी कायदा लागू करावा.

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांचा धर्मावर कोणताही अधिकार नाही. धर्मशास्त्राचे ते पंडित नाही. ते धर्मशास्त्रावर बोलतात. समाजविघातक व्याख्या करतात. त्यांच्यावर बंदी आणावी. याबाबत कायदा महाराष्ट्र सरकारने लागू करावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुसंतांची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, शाही स्नानाचा, अमृत स्नानाचा राजमार्ग असेल या सर्वांचे सुयोग्य नियोजन सरकारच्या माध्यमातून प्रदर्शित व्हावे. कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधूं संतांचा समावेश करण्यात यावा, असे ठराव मांडण्यात आल्याची माहिती अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!