महाराष्ट्र

मूख्यमंत्री वारकरी महामंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी ॲड.श्याम खंडारे महासचीव अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती.

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारक-यांना सोयी सूविधा पूरविण्याकरीता मूख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण-2024/प्र क्र.85 महामंडळे दि.14जूलै 2024 अन्वये शासनाने निर्णय पारीत केला ,मात्र ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणीला एक वर्ष होत आहे महामंडळाची रचना नाही ,कार्य नाही,अंमलबजावणी नाही, आर्थिक तरतूदही नाही.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विचारणा केली असता ह्याबाबतचे काहीही अपडेशन आमचे कडे नसल्याचे ऊत्तर मिळाले,तर ह्या विभागाचे ऊपसचिव मा.जगदिश देवरे साहेबांनी माहीती दिली की ह्या मंडळाच्या आर्थिक तरतूदीचे लेखाशिर्ष ठरविण्याचे काम सूरू असल्याचे सांगीतले गेले.

राज्यातील वारकरी,किर्तनकार कलावंत ह्यांची लाखोची संख्या लक्षात घेवून विधान सभा निवडणूकीच्या तोंडावर मतांची ओंजळ भरून घेण्यासाठी हा फंडा वापरल्याची सर्वत्र चर्चा वारकरी व कलावंतांमधे घूमसत आहे,आळंदी येथे निरपराधप वारक-यांवर पोलीसांनी केलेला लाठीचार्ज मूळे नाराज झालेल्या राज्यातील लाखो वारक-यांना ओवाळणीचे पॅकेज दाखवून नाराजी दूर करण्याचा व कलावंतांची व्होट बॅन्क वळविण्याचा प्रयत्न ह्या महामंडळाच्या आश्वासनातून केला गेला अशी अनूभूती सूध्दा वारक-यांना झाली आहे. वारक-यांच्या कल्याणाचा व प्रस्तावित मूख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या घोषणेचा सरकारला सोयीस्कर विसर पडला असल्याने

अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती वारक-याच्या न्याय हक्कासाठी कटीबध्द आहे,समिती तर्फे एक मे 2025 रोजी प्रत्येक जिल्हाकचेरीवर मा.सोमनाथ दादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष ह्याचे समर्थ नेतृत्वात मा.मूख्यमंत्री ह्यांना आपल्या संवेदनाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी मार्फत सादर करणार आहे.सरकारनी ह्या निवेदनाची योग्य दखल घ्यावी ,अन्यथा ह्या न्याय्य मागणी साठी कलावंत समिती लवकरच पूढील दिशा ठरवून आंदोलन तिव्र करण्याचा विचार करेल असा ईशारा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!